इंग्लंड : आयसीसी आयोजीत जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना एक दिवसावर येउन ठेपला आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मंगळवारी १५ जुन रोजी दुपारी न्युझीलंडने या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. यानंतर काही वेळातच बीसीसीआयने देखील या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली.
दरम्यान, साऊथहॅम्पटन येथील वातावरण हे सध्या अतिशय उष्ण आहे. हे लक्षात घेता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळू शकेल. त्यामुळे भारतीय संघानेऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकीपटू रविंद्र जाडेजा यांना एकत्र खेळण्याची संधी दयावी, असे भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले.
पुढे गावस्कर म्हणाले, मागील काही दिवसांत साऊथहॅम्पटन येथे उष्ण वातावरण आहे. सामना जसजसा पुढे सरकेल, तसतशी खेळपट्टी कोरडी होत जाईल. या खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळण्यास सुरुवात होईल. त्यामुळे भारतीय संघ अश्विन आणि जाडेजा या दोन्ही फिरकीपटूंना खेळवेल अशी मला अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दोन आठवड्यात मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभा राहणार ऑक्सिजन प्लांट!
- जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक फ्रान्सची टोटल एनर्जीज कंपनी करणार मराठवाड्यात गुंतवणूक!
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
- अजब! ‘या’ विषयात बी. कॉमच्या शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला चक्क भोपळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

