औरंगाबाद : शहर व जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. यात रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच चालले आहे. रात्री प्रवास करणारे बहूतेक चालक हे भरधाव वाहन चालवतात असे प्रामुख्याने दिसून येते. अशाच एका अपघातात गुरुवारी रात्री १० च्या सुमारास दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे.
भोकरदन तालुक्यातील आडगाव भौंबे येथील अतुल अशोक आडगावकर व काशिनाथ भोंबे हे सिल्लोड येथून दुचाकीवर आडगाव येथे जात होते. डोंगरगाव फाट्यानजीक राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात अतुल व काशिनाथ दोघेही गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना त्वारित सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमीक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान अतूल आडगावकर याचा मृत्यू झाला आहे. तर काशिनाथ भोंबे यांच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी सिल्लोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास सिल्लोड पोलिस करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना नियमाचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालायावर मनपाची कारवाई; थकबाकीपोटी २ टॉवर सील
- ‘भ्रष्टाचार हा जगण्याचा आणि यंत्रणेचाच भाग; तुम्ही-आम्ही काय करणार ?’
- …म्हणून पंत मला ‘वसिम भाई’ म्हणतो ; अक्षय पटेलने केला खुलासा
- छळवणूकीसह गंभीर आरोप करत संजय राऊतांविरोधात महिलेची उच्च न्यायालयात तक्रार
- आयुक्त साहेब, थोडं लक्ष इकडेही द्या; कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपासमारीची वेळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

