🕒 1 min read
मुंबई: भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यातील लीग टप्प्यातील शेवटचा सामना २७ मार्च रोजी खेळला गेला. कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय संघाच्या पदार्पणातच योग्य ठरला. आजच्या सामन्यात सलामीच्या जोडीने जबरदस्त कामगिरी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मधल्या फळीतील फलंदाजांमुळे भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघासमोर विजयासाठी २७४/७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याला प्रत्युत्तर म्हणून आफ्रिकन संघाने हा सामना ३ विकेट्सने जिंकला आहे.
फलंदाजी करताना भारताने चांगली सुरुवात केली. सलामीवीर स्मृती (Smriti mandhana) आणि शेफालीने (shefali verma)अर्धशतकीय खेळी केली. तसेच कर्णधार मिताली आणि हरमनप्रीतनेही शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. सगळे काही सुरळीत दिसत असताना भारतीय गोलंदाजीने मात्र मार खाल्ला. दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीत कमल दाखवत सामना जिंकला. जिथे त्यांची सलामीवीर वोल्वर्डने ८० धावांची विजयी खेळी केली.
सामन्यातील शेवटचे षटक अतिशय रोमांचक होते. दीप्ती शर्माच्या हातात चेंडू होता आणि उपांत्य फेरी गाठण्याची ही लढाई शेवटपर्यंत चालली. पण, अखेरीस आफ्रिकेने हा सामना ३ विकेटने जिंकला. त्यामुळे टीम इंडियाचे सेमीफायनल गाठण्याचे स्वप्न भंगले आहे. साखळी टप्प्यातील सामना पूर्ण होताच भारताचा या विश्वचषक २०२२ चा प्रवासही संपला आहे. विजयाच्या इतक्या जवळ येऊन भारतीय महिला संघाचे स्वप्न पुन्हा तुटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “संजय राऊतांकडून माझी चेष्टा केली जाते पण हीच चेष्टा त्यांच्या…”, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- IPL 2022: ‘पिवळी जर्सी घालून थेट स्टेडियममध्ये जावं असं वाटतं होत’, सुरेश रैनाचे वक्तव्य व्हायरल
- “राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस वऱ्हाडी”, सुजय विखे पाटलांनी केले ‘मविआ’चे वर्णन
- IPL 2022: उदघाटन सामना सुरु होण्याआधी ‘या’ खेळाडूंना बीसीसीआयने केले सन्मानित!
- “मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ओबीसींवर अन्याय नको”- विजय वडेट्टीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
