मुंबई: मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी मुंबईत ३६ इमारती विकत घेतल्या असून एक हजार कोटींचा घोटाळा समोर आला असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.
“वसुलीबाज शिलेदारांच्या काळ्या पैशाचा छडा केंद्रीय यंत्रणांना लागला आहे. त्याच्या झळा आपल्यापर्यंत येणार या कल्पनेने साहेबांचा तोल गेलाय. जनतेची लूट पचणार नाही. सर्वांचा हिशोब होणार.”, असा अप्रत्यक्ष टोला अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लगावला आहे.
वसुलीबाज शिलेदारांच्या काळ्या पैशाचा छडा केंद्रीय यंत्रणांना लागला आहे, त्याच्या झळा आपल्यापर्यंत येणार या कल्पनेने साहेबांचा तोल गेलाय.
जनतेची लूट पचणार नाही. सर्वांचा हिशोब होणार.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 21, 2022
दरम्यान यशवंत जाधव यांच्या या घोटाळ्याचा ईडी, मंत्रालय, आयकर विभागाकडून तपास सुरू असून काही दिवसात कारवाईची अपेक्षा असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. यशवंत जाधव यांच्याकडे एवढी संपत्ती असेल तर त्यांच्या नेत्यांकडे किती संपत्ती असेल, असा सवालही सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात ते आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अनिल परब, यशवंत जाधवांकडे घबाड कसं आलं?; भातखळकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल
- पुणे विमानतळप्रश्न लवकर मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न- शरद पवार
- IPL 2022: के एल राहुलवर पंजाबसाठी स्लो बॅटिंग केल्याचा आकाश चोप्राचा आरोप ; म्हणाला “कर्णधार म्हणून…”
- “…त्यातील किमान अर्धी कमाई विस्थापित काश्मिरी पंडितांना द्यावी”, काँग्रेसची ‘कश्मीर फाईल्स’ निर्मात्यांना मागणी
- IPL 2022: ईशान किशनकडून मुंबईतील खेळाडूंचे सिक्रेट उघड; व्हिडीओ व्हायरल


