Share

अनिल परब, यशवंत जाधवांकडे घबाड कसं आलं?; भातखळकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी काल (२० मार्च) यावर  प्रतिक्रिया दिली. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही काय मूर्ख नाही. असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.

“३७० कलम कसे हटवले हे जनतेला माहिती आहे. पण जेव्हा वसुलीच्या पलीकडे अक्कल चालत नसते तेव्हा असं काही तरी सुचतं. अनिल परब, यशवंत जाधवांकडे घबाड कसं आलं त्यावर बोला, त्यातला किती वाटा तुमच्याकडे आला हेही सांगा.”, असा सवाल अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत केला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मांडीघाशी केली तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणं शक्य नाही. मी तो कदापि येऊ देणार नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएमसोबत जाणार नाही, असे स्पष्टपणे उध्व ठाकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान एमआयएमने दिलेल्या ऑफर नंतर भाजपने शिवसेनेला निशाण्यावर धरले आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत भाजपला चांगलेच प्रत्युत्तर दिले. ते काल शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित करताना याबाबत बोलत होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!