Share

“…त्यातील किमान अर्धी कमाई विस्थापित काश्मिरी पंडितांना द्यावी”, काँग्रेसची ‘कश्मीर फाईल्स’ निर्मात्यांना मागणी 

Published On: 

मुंबई: देशभरात सध्या ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचीच चर्चा सुरु आहे. हा सिनेमा म्हणजे काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना आता काँग्रेस नेते अतुल लोंढे (Congress leader Atul Londhe) यांनी यांनी थेट चित्रपट निर्मात्यांकडे मागणी केली आहे.

१३ कोटी रुपयांत बनलेला  ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाने आतापर्यंत १३० कोटी रु. ची कमाई केली आहे, त्यातील किमान अर्धी कमाई विस्थापित काश्मिरी पंडितांना द्यावी. जर त्यांची खरंच काळजी असेल तर.”, असे ट्वीट अतुल लोंढे यांनी केले आहे. दरम्यान काँग्रेसकडून या चित्रपटात सत्यता लपवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर भाजपकडून हा चित्रपट म्हणजे कॉंग्रेसमुळे काश्मिरी जनतेला भोगावे लागणारे अन्याय, अत्याचार असल्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे म्हटले जात आहे. 

त्यामुळे या चित्रपटामुळे राज्यात मविआ विरुद्ध भाजप तर देशात काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष पहावयास मिळत आहे. यावरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “काश्मिरमध्ये जे काही घडलं आणि जे सध्या दाखवले जात आहे त्यामध्ये फरक आहे. त्यावेळी देशाचे नेतृत्व हे काँग्रेसकडे नसून विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याकडे होते. भाजपच्या पाठबळामुळेच या कालावधीत मुफ्ती मोहमम्मद सईद हे देशाचे गृहमंत्री झाले होते. तेव्हा जम्मू-काश्मिरमध्ये राज्यपाल राजवट होती. तसेच तेथील राज्यपालही काँग्रेसच्या विचारांचे नव्हते.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!