🕒 1 min read
पुणे : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये घट होत असून कोरोना मुक्तांचा आकडा हा अधिक आहे. मात्र, अद्यापही राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या हि चार लाखांपार असून दररोज रुग्णांमध्ये होणारी वाढ ही देखील आटोक्याबाहेर आहे. अशातच, तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला असून लहान वयोगटातील मुला-मुलींना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आता राज्यातील निर्बंध पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत भाष्य केलं आहे.
‘आज २१ मे आहे, १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत आपण लॉकडाऊन कायम ठेवला आहे. लॉकडाऊन केल्याचे चांगले परिणाम पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आले आहेत. त्यामुळे पुढे काय करायचं याचा निर्णय अद्याप झालेला नाही. योग्य वेळी त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. आणखी दहा दिवस आपल्या हातात आहेत. त्यानंतर काय निर्णय करायचा ते पाहू,’ असं अजित पवार म्हटले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराज, मोदींना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा प्रत्यय पुन्हा दाखवण्याची वेळ आलीये!’
- ‘मोदी कशाचीही जबाबदारी घेत नाहीत’, भाजप खासदाराचा घरचा आहेर
- पंतप्रधान मोदी कोणत्याच राज्यांसोबत भेदभाव करू शकत नाहीत : चंद्रकांत पाटील
- ‘भविष्यकाळात राजकीय नेत्यांनी शब्दांची मोडतोड करून उजनी धरणाच्या पाण्यावर डल्ला मारू नये’
- ‘फोटोसेशन नव्हे तर मदतीसाठी आलोय’, रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
