Share

“अक्कलदाढ एवढी उशिरा का येते?”, संजय राऊतांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल (२ एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेवर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पलटवार केला आहे. तसेच अक्कलदाढ एवढी उशिरा का येते?, असा खोचक सवालही राऊतांनी केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘अक्कलदाढ एवढी उशिरा का येते? याचा अभ्यास करावा लागेल. अडीच वर्षानंतर बोलत आहात. भाजप आणि शिवसेनेत काय झालं ते आम्ही पाहू. तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही आत यायची. तुम्ही तुमचं बघा’, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘भाजप शासित राज्यात किती भोंगे हटवले ते सांगा? काल शिवाजी पार्कमध्ये भाजपचाच भोंगा वाजत होता. स्क्रिप्टही भाजपचीच होती आणि टाळ्या, घोषणाही भाजपच्याच स्पॉन्सर्ड होत्या. त्यामुळे लोकांना वाटलं कालची सभा भाजपची आहे.’ तसेच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एवढी विकासाची कामे केली. मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन केले. ते राज ठाकरेंना दिसले नाही का?, असा सवालही राऊतांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!