Share

IPL 2022 : मुंबईचा अजून एक पराभव..! रोहित शर्मानं कोणावर फोडलं खापर? वाचा सविस्तर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई इंडियन्स संघाची आयपीएलमध्ये आतापर्यंतची कामगिरी खराब राहिली आहे. मुंबई संघाला दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राजस्थान रॉयल्सने शनिवारी मुंबईविरुद्ध २३ धावांनी विजय नोंदवला. या पराभवानंतर रोहित शर्माने काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला.

रोहित शर्मा म्हणाला, ”मला वाटले की त्यांनी चांगली फलंदाजी करून १९३ धावा केल्या. बटलरने अपवादात्मक खेळी खेळली, आम्ही आऊट करण्यासाठी सर्व काही केले. पण मला वाटले की त्या खेळपट्टीवर १९३ धावांचा पाठलाग करता आला असता, विशेषतः जेव्हा आम्हाला ७ षटकात ७० धावांची गरज होती.”

”या गोष्टी घडतात. यातून आपण काहीतरी सकारात्मक शिकू शकतो. बुमराहने चांगली गोलंदाजी केली. तिलक अपवादात्मक खेळला, तर इशानची फलंदाजीही उत्कृष्ट होती. दोघांपैकी कोणीही शेवटपर्यंत फलंदाजी केली असती, तर फरक पडला असता असे मला वाटते. सूर्यकुमार यादव आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. एकदा तो तंदुरुस्त झाला की तो संघात येईल त्यामुळे त्याने बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे”, असेही रोहितने म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!