Share

“मलिकांच्या अटकेनंतर मोदींना भेटण्याची तत्परता का नाही?”, इम्तियाज जलील यांचा शरद पवारांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर काल (६ एप्रिल) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शरद पवारांना खोचक सवाल केला आहे.

या संदर्भात इम्तियाज जलील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘फक्त संजय राऊतांबद्दल चर्चा? का? तुमच्या पक्षाचेच मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली तेव्हा तुम्हाला इतक्या गडबडीत मोदींशी चर्चा करावीशी वाटली नाही? की संजय राऊत नवाब मलिकांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. तुमच्याकडे खेळण्यासाठी स्वतःचे खेळ आहेत’, असे जलील म्हणाले.

दरम्यान, याविषयी काल पत्रकारांशी संवाद साधत असतांना शरद पवार म्हणाले की,‘संजय राऊत यांच्या मालकीची केवळ अर्धा एकर जमीन अलिबागमध्ये आहे. अशा क्षुल्लक कारणासाठी एका ज्येष्ठ पत्रकारावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करणे योग्य नाही.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!