Share

“असल्या वैचारिक लबाडीमुळेच काँग्रेस…”, भातखळकरांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मध्य प्रदेशात पुन्हा सत्तेत येण्याची वाट पाहणारी काँग्रेस आता सॉफ्ट हिंदुत्वाच्या वाटेवर आहे, मात्र या पक्षाला सुरुवातीपासूनच धक्के बसू लागले आहेत. प्रदेश काँग्रेसने आपल्या पदाधिकाऱ्यांना रामनवमी आणि हनुमान जयंती भव्य पद्धतीने साजरी करण्याच्या सूचना दिल्यावर पक्षाचे आमदार आरिफ मसूद यांनी यावर प्रश्न उपस्थित केला. राम आणि हनुमान यांच्यातील पार्टी रमजान का विसरली असा सवाल मसूद यांनी केला. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राजकीय फायद्यासाठी हिंदुत्वाचे ढोंग रचून रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करणाऱ्या काँग्रेसचे वस्त्रहरण काँग्रेसच्याच आरिफ मसूद या आमदाराने “काँग्रेस रमजान का साजरा करत नाही?” असा मार्मिक प्रश्न विचारून केले आहे. असल्या वैचारिक लबाडी मुळेच काँग्रेस जनतेच्या मनातून साफ उतरली आहे’, असे भातखळकर म्हणाले.

दरम्यान, रामनवमी आणि हनुमान जयंती भव्य पद्धतीने साजरी करण्याचे पत्र प्रदेश काँग्रेसने सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना पाठवले आहे. पत्रात म्हटले आहे की, रामनवमीच्या दिवशी कार्यकर्त्यांनी रामकथा, रामलीला आणि रामाच्या पूजेचे कार्यक्रम करावेत. तसेच हनुमान जयंतीला हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रामनवमी १० एप्रिलला आहे तर हनुमान जयंती १६ एप्रिलला आहे. सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, आमदार, माजी आमदार, लोकसभेचे उमेदवार आणि आघाडी-संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!