मुंबई : देशातील कोरोनाच्या स्थितीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधींसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काही सूचना केल्या होत्या. पण सध्या महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर झाली आहे. येथे काँग्रेस सत्तेत आहे. मग मनमोहन सिंग यांनी अशा सूचना त्यांनी महाविकास आघाडी सरकारला का दिल्या नाहीत, असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला देशात नकारात्मकतेचं वातावरण तयार करायचं आहे. मला प्रियंका गांधींना विचारायला आवडेल की त्यांनी कधी या गोष्टींबाबत महाराष्ट्रातील त्यांच्या सरकारसोबत चर्चा केली. सध्या तिथे काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला? महाराष्ट्रात कोविडमुळे ३८ ते ४० टक्के मृत्यू झाले आहेत, याची कधी त्यांनी चौकशी केली? असे अनेक सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलेत.
देशातील एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रातील ३५ ते ४० टक्के रुग्ण आहे. यापैकी ३५ ते ३७ टक्के रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल आहेत. पहिल्या लाटेत राज्याला बिकट परिस्थितीतून जावे लागले. पूर्वानुभव असताना राज्य सरकार दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता तयार का राहिलं नाही? उलट काहीतरी भयानक सुरू असल्याची गोष्ट सांगण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले. मग त्यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या सरकारला तसा सल्ला का नाही दिला? असा आरोपही फडणवीस यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाचा परिणाम! अनेकांनी ‘ऑक्सिजन’ नावाच्या कंपनीत गुंतवले पैसे, नंतर कळाले ही तर..
- हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मंजूर, आ.चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश
- कोरोनाच्या लढ्यात भाजपकडून राजकारणाला महत्त्व-प्रकाश आंबेडकर
- ‘फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
- ‘विकास दर टिकवण्यासाठी उद्योग आणि सरकारमध्ये पूर्ण विश्वास हवा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

