Share

कोरोनाच्या लढ्यात भाजपकडून राजकारणाला महत्त्व-प्रकाश आंबेडकर

Published On: 

🕒 1 min read

अकोला : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र व राज्य सरकारला मानवी जीवापेक्षा उद्योग महत्त्वाचे वाटतात, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. रेमडेसिविर इंजेक्शनच्या साठ्यावरून एका फार्मा कंपनीच्या बचावासाठी भाजप नेत्यांची पुढाकार घेतला. त्यामुळे भाजपला कोरोनाविरुद्धच्या लढ्यापेक्षा राजकारणातच महत्त्व आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सध्या कोरोना कसा भीतीदायक आहे, हे बिंबवण्यात येत आहे. त्यापेक्षा त्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत न्यायालयाने टिप्पणी केल्यानंतर औद्योगिकसाठीचा वापर बंद झाला. सरकारला मानवी जीव किड्यामुंग्यांसारखी वाटत असून, माणुसकी शिल्लक राहिली आहे काय, असा प्रश्न सध्या पडत आहे.

केंद्र सरकारकडून लसीचे मार्केटिंग होत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. लस टोचून घेतल्यानंतरही आवश्यक ती काळजी घ्यावीच लागणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून व्यवस्थापन अजिबात होत नाहीये. निर्बंध, मार्गदर्शक सूचनांमध्ये विसंगती असल्याचा आरोप केला. ७० वर्षांच्या काळात १० लाख रुग्णांवर एकाच वेळी उपचार होतील, एवढ्याही खाटा उपलब्ध न होणे ही शोकांतिका असल्याचे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!