मुंबई : ‘मागील काही दिवसांपासून गाडीत बसलेले हे लोक माझे घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत’, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी ट्वीट करत केला आहे. फक्त एवढेच नाही तर या संशयितांचे फोटो देखील मलिकांनी ट्विट केले आहेत.
ट्विटमध्ये मलिक म्हणाले आहेत की,’या गाडीत बसलेले हे लोक मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत असलेल्या लोकांनी मला येऊन भेटावं, मी सर्व माहिती देतो असंच माझं त्यांना सांगणं आहे.’ मात्र आता या ट्वीटवरूनच भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar)यांनी मलिक यांना सवाल करत टोला लगावला आहे.
यह लोग इस गाड़ी में सवार पिछले कुछ दिनों से मेरे घर और स्कूल की 'रेकी' कर रहे हैं.
अगर कोई इन्हें पहचानता हो तो मुझे जानकारी दे.
जो लोग इस तस्वीर में हैं, मेरा उनसे कहना हैं कि, तुम्हें मेरी कोई जानकारी चाहिए तो आकार मुझसे मिले, मैं सारी जानकारी दे दूँगा pic.twitter.com/ZAmJhqEWoL— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 26, 2021
नवाब मलिक स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत. राज्याचे गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत.
मग आपल्या घरावर पाळत ठेवली जाते ही तक्रार ते ट्विट करून का करतात? की गृहमंत्र्यांवरही विश्वास नाही? https://t.co/JqMaPpzZIV— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 27, 2021
नवाब मलिक स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत. राज्याचे गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत. मग आपल्या घरावर पाळत ठेवली जाते ही तक्रार ते ट्विट करून का करतात? की गृहमंत्र्यांवरही विश्वास नाही का? असा खोचक सवाल करणारे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी नवाब मलिकांना टोला लगावला आहे.
दरम्यान, मलिक यांनी एकूण ५ फोटो ट्वीट केले असून यात एका कारमध्ये दोन व्यक्ती बसलेले दिसत आहेत. त्यातील एक गाडी चालवत आहे, तर दुसरा मागच्या बाजूला बसला आहे. मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने मास्क घातलेला दिसत असून त्याच्या हातात कॅमेरा देखील दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये गाडीचा क्रमांकही दिसतो आहे. परंतु, हे फोटो नेमके कुणाचे आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या:
- आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; ‘या’ खेळाडूकडे असणार कर्णधारपद
- इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सात्त्विक-चिराग यांची विजयी घोडदौड
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर
- टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भयभीत होता; इंझमामचे बेधडक वक्तव्य
- ‘भारत हा सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश असून पाश्चात्य माध्यमांना भारताची प्रगती बघवत नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

