Share

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भयभीत होता; इंझमामचे बेधडक वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: टी-२० र्ल्डकप २०२१ स्पर्धेमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने(virat kohali) नाणेफेक गमावली आणि संघाला १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने (inzamam ul haq)यावरच आपली बेधडक प्रतिक्रिया दिली आहे. टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला, कारण नाणेफेकीपूर्वी त्यांच्या खेळाडूंवर दबाव होता, असे वक्तव्य इंझमामने केले आहे.

इंझमामने म्हटले आहे की, जेव्हा मी नाणेफेक दरम्यान विराट कोहली आणि बाबर आझमला पाहिले तेव्हा हे स्पष्ट झाले की भारतीयांवर खूप दबाव आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने बाद करण्यापूर्वीच भारतावर दबाव होता.कारण ते भयभीत होते.सामन्यापूर्वीच ते दडपणाखाली होते आणि त्यामुळेच त्यांचा १० विकेट्सने पराभव झाला. तुम्ही त्याचे शारीरिक हावभाव पाहू शकता. ते भयभीत दिसत होते, तर पाकिस्तानचे खेळाडू सामना जिंकण्यासाठी अधिक आत्मविश्वास आणि उत्साही होते.

भारत सुरुवातीपासूनच विजेतेपदाचा दावेदार होता, पण खूप दबावामुळे त्यांना विजय मिळाला नाही. भारतीय संघ कधीही टी-२० विश्वचषकात आपल्या खेळाडूंप्रमाणे खेळत नाही. ते एक चांगले टी-२० संघ आहेत यात शंका नाही. गेल्या २-३ वर्षातील त्यांची कामगिरी पाहिली तर खरोखरच खूप छान प्रवास झाला असे विधान इंझमाम-उल-हक यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!