Share

विद्यार्थ्यांच्या नावाखाली कोणाचे ‘पोषण’? ५० किलोच्या गोणीत फक्त ३५ किलो तांदूळ!

Published On: 

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा आणि देवधानोरा येथील जिल्हा परिषद शाळेत ठेकेदारामार्फत पोषक आहार पुरवठा करण्यात येतो. मात्र, तांदळाच्या ५० किलोच्या गोण्यामध्ये ३५ किलोच तांदुळ आणि ४५ किलो मसूर दाळ आढळून आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या या आहाराच्या आडून नेमके कोणाचे ‘पोषण’ होत आहे, असा सवाल पालकांनी विचारला आहे.

शालेय पोषण आहार योजनेसाठी ग्रामीण आणि शहरी भागात तांदूळ व अन्य धान्यांचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली जाते. दि.२६ रोजी गोविंदपूर केंद्रातील शाळांना एका वाहनाच्या मार्फत पोषण आहार पुरवठा करण्यात आला. भाटशिरपुरा येथे शाळेची ११५० किलो तांदळाची मागणी आहे.

त्यानुसार आलेल्या धान्याच्या प्रत्येक गोणीचे वजन करून घेत असताना तांदळाच्या अर्ध्या गोण्यात ५० किलोऐवजी कमी तांदुळ भरला. एकूण मागणीच्या तुलनेत ही तफावत १२० किलोची होती. तसेच मसुर दाळीच्या गोणीत ५० ऐवजी ४५ किलोच दाळ निघाली. यावेळी भाटशिरपुरा येथील मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांनी कंत्राटदाराकडून फरकाचे धान्य वसूल केल्याचे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!