जयपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका ही टीम इंडिया ( team india ) साठी एका नव्या युगाची सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या सामन्यात कॉमेंट्री करत असताना टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( sunil gavskar )यांनी माजी टी-२० कर्णधार विराट कोहली (virat kohli ) आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shashtri) यांच्यावर निशाणा साधला आहे.
मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हर्षल पटेलने टीम इंडियात पदार्पण केले आणि त्याला माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने पदार्पण कॅप दिली. दरम्यान, गावस्कर समालोचन करताना म्हंटले की, ‘माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी माजी क्रिकेटपटूंकडून डेब्यू क्रिकेटपटूंना कॅप्स मिळवून देण्याचे काम सुरू केले, परंतु शास्त्री आणि कोहली यांनी ते पुढे नेले नाही.
गावस्कर म्हणाले की, ‘शास्त्री आणि कोहलीच्या राजवटीत हे पाहिले गेले नाही, तर राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी ही परंपरा पुढे चालवली आहे. या मालिकेत टीम इंडियासाठी दोन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. व्यंकटेश अय्यरने पहिल्या सामन्यात पदार्पण केले, तर हर्षलने दुसऱ्या सामन्यात पदार्पण केले. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने २-० अशी आघाडी घेतली. मात्र, गावस्कर यांची ही टिप्पणी चाहत्यांना फारशी आवडली नाही. द्रविड आणि रोहितची स्तुती योग्यच आहे, मात्र शास्त्री आणि कोहली यांना अशा प्रकारे टार्गेट करणे चुकीचे असल्याचे चाहत्यांनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘बैल कितना भी अड़ियल क्यों न हो, पर..’, राऊतांचा मोदींना अप्रत्यक्ष टोला
- रायगडात महागाईविरोधात कॉंग्रेसचे जनजागरण अभियान; मंत्री वडेट्टीवारांची उपस्थिती
- ‘आयपीएल नसती तर कदाचित हर्षल पटेलला भारतीय संघात स्थान मिळाले नसते’
- ‘मानिके मागे हिते’ गाण्याचा अमृता फडणवीसांनी केलं रिमेक गाणं, पाहा व्हिडीओ
- ‘असत्यावर सत्याने मिळवलेला हा विजय’; राहुल गांधी यांचे शेतकऱ्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

