Share

पाठीत खंजीर खुपसणारे कोण असं म्हटल्यावर आता दोन चेहरे डोळ्यासमोर येतात – चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून सर्वाधिक आमदार असून देखील ऐनवेळी शिवसेनेशी युती तुटल्यामुळे विरोधी पक्षात बसावं लागलेल्या भाजपने हल्लाबोल केला आहे. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असा दावा करण्यासोबतच मंत्र्यांनी घोटाळा केल्याचे आरोप भाजपकडून सातत्याने केले जात आहेत. तर, शिवसेनेनं साथ सोडल्याची सल देखील भाजपच्या नेत्यांनी अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

दरम्यान, शिवसेना आणि भाजपमधील कमालीचा संघर्ष वाढला असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जहरी टीका केली आहे. ‘पाठीत खंजीर खुपसणारे असं म्हटलं केलं की आधी एकाच नेत्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. मात्र आता पाठीत खंजीर खुपसणारे म्हटल्यावर आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो,’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘काही पक्ष आपल्यासोबत प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्ष, विनायक मेटेंच्या शिवसंग्राम, महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोतांच्या रयत क्रांती संघटनेचा समावेश होतो. याशिवाय आणखी काही छोटे पक्ष सोबत आहेत. मात्र काही जणांची स्थिती नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी आहे. ५६ आमदार असताना ते मुख्यमंत्री झाले आहेत,’ असा खोचक टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!