Share

‘एकाला ईडीची नोटीस आली कि लॉकडाऊन, हे चालणार नाही; वसूली सोडून दुसरीकडेही लक्ष द्या’

Published On: 

ठाणे : दहीहंडी उत्सवासाठी तसेच मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करून सर्वसामान्य जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्यानी कोरोनाच्या विरोधात आंदोलने उभी करावी, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला लगावला होता. तसेच, हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही, हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे, असं देखील ठाकरे म्हणाले होते.

आता यावरूनच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. सध्या कल्याण डोंबिवली क्षेत्रामध्ये पुरेश्याप्रमाणामध्ये मोफत लसी उपलब्ध नसल्याची तक्रार केली जातेय. त्यामुळे राजू पाटील यांनी मोफत स्लीकरण शिबीर आयोजित केलं आहे. यासंदर्भात पाटील म्हणाले, ‘आम्ही लसी विकत घेऊन त्या मोफत वाटत आहोत. प्रशासनानेही लसी विकत घेऊन मोफत दिल्या पाहिजेत असं सांगतानाच आम्ही हे करोना संपवण्यासाठी केलेलं एका प्रकारचं आंदोलनच आहे.’

याबाबत त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यातील कॅप्शनमधून मुख्यमंत्री ठाकरेंवर खोचक निशाणा साधला आहे. ‘काल सेनेचे मुख्यमंत्री बोलले की ‘आंदोलन करायचेच झाले तर ते कोरोना संपविण्यासाठी करा.’ अहो आम्ही ते ही करत आहोत, पण वसूली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला ? एकाला ED ची नोटीस आली की लावा लॅाकडाऊन,हे आता चालणार नाही,’ असा घणाघात राजू पाटील यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!