नवी दिल्ली : मोदी सरकार भारतातील नागरिकांकडून पैसा काढून घेत आहे. आणि तो ठराविक लोकांना दिला जातोय, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. देशात पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढवून सरकार मोठी कमाई केली. तरीही देशाच्या मालमत्तांची विक्री केली जात आहे. त्यामुळे कमाईचा पैसा नक्की जातोय कुठे? असा सवालही यावेळी त्यांनी केला. केंद्र सरकारच्या कारभारवर भाष्य करण्यासाठी आयोजिक पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘आम्ही सरकारमधून बाहेर पडलो तेव्हा व आताच्या पेट्रोलच्या दरात ४२ टक्के वाढ झाली आहे. गॅसच्या दरात ११६ टक्के वाढ झाली आहे. तर पेट्रोलचे दर ४२ टक्क्यांनी व डिझेलचे दर ५५ टक्के इतके प्रचंड वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव १०५ रुपये होता. जो आता ७१ रुपये झाला म्हणजे कच्च्या तेलाच्या भावात वास्तवात ३२ टक्के घट झाली आहे. गॅसच्या किमतीत २६ टक्के घट झाली आहे. पण नागरिकांना मिळणाऱ्या गॅसच्या किमतीत मात्र ११६ टक्के वाढ झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला.
The government earned Rs 23 Lakh Crores through GDP – not the Gross Domestic Product but the Gas-Diesel-Petrol. Where did this Rs 23 Lakh Crores go?: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/DfmnN6MVOM
— ANI (@ANI) September 1, 2021
‘भाजपा सरकार प्रत्येकाला लुटण्यात व्यस्त आहे. पण आता संपूर्ण देश या लुटीच्या विरोधात एकत्र येत आहे. GDP त वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किमतीत वाढ आहे’, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ करून मोदी सरकारनं तब्बल २३ लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून गोळा केले आहेत, ते गेले कुठे असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘रामाची नियत खराब होती जयकुमार गोरेची चांगली आहे’ ; भाजप आमदारचे वादग्रस्त विधान
- ‘राज्याला बंदिवान केल्याचा रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांच्या नावावर’, भाजपचा टोला
- ‘आम्ही परंपरा जपतोय; राणेंच्या घराबाहेर हजारो लोक जमले तेव्हा मात्र गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली नाही’
- ‘…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो’; फडणवीसांच महत्वाचं विधान
- ‘राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे हल्लेखोर फेरीवाल्याला प्रसाद देणार’ ; अविनाश जाधव आक्रमक


