Share

‘जेव्हा तुमच्याकडे माही भाई असतो तेव्हा…’, धमाकेदार खेळीचे ऋतुराजने कर्णधाराला दिले श्रेय

Published On: 

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा विजयासह सुरू केला. त्यांनी मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. चेन्नईने 6 विकेट्सवर 156 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून मुंबई इंडियन्सचा संघ 8 विकेटवर 136 धावाच करू शकला.

चेन्नईचाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या वेगवान गोलंदाजांसमोर चेन्नईने पॉवरप्लेमध्ये आपल्या चार विकेट गमावल्या. स्कोअर 24 रन होता. यावर अंबाती रायडू जखमी झाला आणि तो पॅव्हेलियनमध्ये होता. एकूणच, चेन्नईसाठी परिस्थिती चांगली नव्हती पण त्यावेळी चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड नाबाद 88 धावा खेळला. आणि या सामन्यात विजयचा शिलेदार ठरला.

या रंजक सामन्यानंतर गायकवाड म्हणाला, ‘अर्थातच, हा माझ्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम डावांपैकी एक होता. सुरुवातीच्या विकेट पडल्याने संघ दबावाखाली होता. अशा परिस्थितीत, मी विकेटवर राहण्याचा आणि स्कोअर 130, 140 आणि शक्य असल्यास 150 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करत होतो.

संघ व्यवस्थापनाकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे गायकवाडने सांगितले. तो म्हणाला, ‘जेव्हा तुमच्याकडे माही भाई आणि चेन्नई सुपर किंग्जचे व्यवस्थापन असते, तेव्हा तुम्हाला कशाचाही विचार करण्याची गरज नाही.’ गायकवाड पुढे म्हणाला, श्रीलंका दौरा आणि येथे (यूएई) केलेल्या तयारीने खूप मदत मिळली.’

गायकवाडने रवींद्र जडेजासह पाचव्या विकेटसाठी 81 धावा जोडल्या. जडेजाने 33 चेंडूत 26 धावा केल्या. गायकवाड म्हणाला की, जडेजा क्रीजवर आला होता, म्हणून मी धावा काढण्यासाठी रिस्क घेतली. वाच्या शेवटी गायकवाडला ब्राव्होने साथ दिली, ज्याने फक्त 8 चेंडूत 23 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!