Share

अधिवेशन संपले मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला

Published On: 

मुंबई – कोरोना प्रादुर्भावाचं कारण देत महाविकास आघाडी सरकारने यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं घेण्याचा निर्णय घेतला होता. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडी शिवाय होणारं हे दुसरं अधिवेशन ठरले आहे.अध्यक्षांची निवड व्हावी यासाठी विरोधी पक्षातील भाजपसह सत्ताधारी पक्षातील काँग्रेसही आग्रही होती. मात्र या अधिवेशनात देखील विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही.

महाविकास आघाडीत सध्या शीतयुद्ध सुरू आहे. कॉंग्रेस उमेदवार कोण देणार यावर देखील मते फुटणार की नाही याचे भवितव्य अवलंबून होते. काँग्रेसच्या ज्या दोन उमेदवारांची नावं चर्चेत होती त्यांना राष्ट्रवादीचे नेते पाठींबा देतील की नाही याबाबत देखील साशंकता होती या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर दोन दिवस चाललेल्या अधिवेशनात तरी मिळालेले नाही. महाविकास आघाडी सरकारला काँग्रेसचा अध्यक्ष द्यायला हरकत नव्हती पण मतदान मात्र ओपन बॅलेटने हवे होते. नियमानुसार ते मात्र गुप्तपणे घ्यावे लागणार हे लक्षात आल्यावर शेवटच्या क्षणापर्यंत ह्यावर तिन्ही पक्षांमध्ये बरीच चर्चा होऊन ही निवडणूक पुढे ढकलली असल्याचे कळतंय.

अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया विधीमंडळ अधिवेशन सुरु असतानाच घ्यावी लागते. गुप्त मतदानानीच निवडणूक हा नियम असून आमदारांच्या निलंबनामुळे ती थांबू शकत नाही असे सांगितले जाते. सदनात असणाऱ्या आमदारांनाच मतदान करता येते. आणि आता भाजपचे १२ आमदार देखील निलंबित झाल्याने आता ही निवडणूक ही थेट हिवाळी अधिवेशनातच घेतली जाणर असल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!