पुणे: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik resignation) यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. आता यासर्व प्रकरणावरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी भाजपला आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा दाखला दिला आहे.
“नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अटक केली. गेली २० वर्ष ते विधानसभेत आहेत. त्या काळात त्यांच्यावर कधी आरोप झाले नाहीत. आता त्यांचे संबंध दाऊदशी असल्याचा दिसतोय. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर त्याला दाऊदचा जोडीदार समजलं जातं. कारण नसताना आरोप केले जातात. मला त्याची चिंता नाही. कधीकाळी माझ्यावरही आरोप केले होते. हे लोक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला चिंता करण्याचं कारण नाही. नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांना यातना दिल्या जात आहेत. जाणूनबाजून हे केलं जात आहे.”, असा आरोप शरद पवारांनी केला आहे.
तसेच “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे जुने सहकारी राणे साहेब यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला हे माझ्या पाहण्यात आलं नाही. म्हणजे एक न्याय राणेंना लावता अन् दुसरा न्याय मलिकांना लावता याचा अर्थ हा सर्व राजकीय उद्देशाने सुरू केलेला उद्योग आहे. त्यामुळे उद्या पंतप्रधान पुण्यात येतील तेव्हा ते कदाचित याचा खुलासा करतील”,असा टोलाही शरद पवारांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
सलमान खानसोबत चक्क लग्नाचे फोटो ? ‘सोनाक्षी सिन्हाने केला खुलासा’
“मोदींच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोच्या…”, शरद पवारांचे मोठे वक्तव्य
राज्यपाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करताय; संजय राऊतांचा प्रहार
इंग्लिश कर्णधाराकडून क्रिकेटच्या जादुगारला श्रद्धांजली, भावनिक होत म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

