Share

‘मास्क न वापरण्यात कसलं शौर्य आलंय?’ मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोना रोगाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. तर, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन देखील लागू करण्यात येत आहे. अशातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सार्वजनिक ठिकाणी देखील मास्क वापरत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.

यामुळे, काही नेत्यांनी राज ठाकरेंना लक्ष्य देखील केलं होतं. दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने संपूर्ण राज्यात कोणते कडक निर्बंध लागणार याबाबत काहीशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेला संबोधित केले आहे. तर, त्यांनी मास्क न घालणाऱ्यांवर नाराजी व्यक्त करतानाच अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

‘मी कोरोना लसीचे डोस घेतले आहेत. तरीदेखील सार्वजनिक ठिकाणी मास्क काटेकोरपणे घालतोय. लस घेऊनही मास्क घालणं आवश्यक आहे. काही जणांना असे वाटतं मास्क काय घालतोय ? मी मास्क लावणार नाही. मात्र मास्क न वापरण्यात कसलं मास्क न वापरण्यात कसलं शौर्य आलंय?’ असं भाष्य करत त्यांनी मास्क सक्तीने घालण्याचं आवाहन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!