Share

मागच्या वर्षी ३७ कारखान्यांना हमी दिली त्याचं काय?; निलेश राणेंचा अजित पवारांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील थकबाकीदार कारखान्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, “आता सरकार सहकारी साखर कारखान्यांना हमी देत नाही. जो-तो स्वतःच्या ताकदीवर कारखाना चालवत आहे. अनेक बँका कर्ज दिल्यामुळे आतापर्यंत अडचणीत आल्या होत्या. मात्र, सध्या राज्य सहकारी बँकेचा नफा ३८० कोटींवर गेला आहे.”, यावरून फडणवीस आणि अजित पवार यांच्यात कलगीतुरा पहावयास मिळाला. आता यावरच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) सवाल केला आहे.

“मागच्या वर्षी ३७ कारखान्यांना हमी दिली त्याचं काय? कारखान्यांना वित्तसंस्था कर्ज देणार नाही हे कळताच शेतकऱ्यांची तडफड होणार आणि या निर्णयाची सर्वात मोठी किंमत शेतकऱ्याला भोगावी लागणार. हमी देताच कामा नये पण त्याचबरोबर शेतकर्‍यांना त्रास होणार नाही त्यावर अजित पवारांनी बोलावं.”, असे आव्हान निलेश राणे यांनी ट्वीट करत दिले आहे.

दरम्यान अण्णा हजारे यांनी ४९ साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहारात २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करून थेट केंद्राकडे चौकशीची मागणी केली होती. अमित शहा यांच्याकडे या खात्याचा कारभार आल्यानंतर पवारांशी संबंधित कारखान्याचीच चौकशी सध्या ईडीमार्फत सुरू आहे. यावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!