🕒 1 min read
मुंबई: श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचे दोन दिग्गज खेळाडू थेट संघात दाखल झाले आहेत. भारताविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. ज्यामध्ये भारताने पाहुण्या संघाचा २-० असा पराभव केला. आता २६ मार्चपासून आयपीएलही सुरू होणार आहे. ज्यासाठी खेळाडूंनाही तयारी करावी लागते. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे की मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह सोमवारी रात्री उशिराच IPL 2022 च्या १५ व्या हंगामासाठी मुंबई संघात सामील झाले आहेत.
मुंबई इंडियन्सचा ( mumbai indians) कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) आणि जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) कसोटी मालिका जिंकल्यानंतर आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे दोन्ही खेळाडू मुंबई इंडियन्समध्ये सहभागी होण्यासाठी बेंगळुरूहून ट्रायडंट बीकेसी येथे पोहोचले. या दोन्ही खेळाडूंना आयसोलेशनच्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यानंतर टीमचा बायो बबलशी जोडला जाईल. त्याचवेळी टीमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा त्याची मुलगी समायराला कडेवर घेऊन जिंकलेल्या ट्रॉफीज दाखवत आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1503591433583824901?s=20&t=MW8MP6OnGCBV6eObSsfXPA
मुंबई इंडियन्स संघ पाच वेळा विजेता आहे आणि तो २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना खेळेल. हा सामना सीसीआय ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या दोन्ही संघाची लढत अटीतटीची होताना दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “काँग्रेसने बेगडी निधर्मीवादाचा ‘हिजाब’ दूर करायला हवा”, संजय राऊतांचा सल्ला
- वासिम जाफरने केले रोहित शर्माचे कौतुक; म्हणाला “विराट कोहलीपेक्षा चांगला कसोटी कर्णधार…”
- IPL 2022: अजित आगरकरचा ‘या’ आयपीएल फ्रँचाइसीबाबत खुलासा; म्हणाला “सगळे त्यांच्यावर हसत…”
- ‘तेव्हा आम्ही बघूच की कोण आयपीएल खेळायला जातो’ ; पीएसएलमध्ये मोठा बदल आणण्याचे रमीज राजांचे संकेत
- IPL 2022: सुरेश रैना आयपीएलमध्ये परतणार; यंदा मात्र एका नवीन रूपात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
