मुंबई : आयसीसी आयोजीत जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना एक दिवसावर येउन ठेपला आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मंगळवारी १५ जुन रोजी दुपारी न्युझीलंडने या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. यानंतर काही वेळातच बीसीसीआयने देखील या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या सामन्यासाठी भारताने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली असून पाच वेगवान गोलंदाजांना संघात स्थान मिळाले आहे.
या फायनलपूर्वी टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहची मुलाखत त्याची पत्नी संजना गणेशननं घेतली आहे. या मुलाखतीदरम्यान, पत्नी संजनाने बुमराहाला आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांवर बोलतं केलं आहे. संजना ही टीव्ही अँकर आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच संजनाने बुमराहची मुलाखत घेतली आहे. आयसीसीनं (ICC) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही मुलाखत शेअर केली आहे.
Playing with his sister, starring in school cricket and ‘the best day’ of his life.@SanjanaGanesan takes @Jaspritbumrah93 through some Insta Memories before the #WTC21 Final ???? pic.twitter.com/k8FKUxgQJI
— ICC (@ICC) June 17, 2021
बुमराहनं आपल्या आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केला आहे. लहापानापासून ते आता पर्यंतचा संपूर्ण क्रिकेट प्रवास त्याने या मुलाखतीतून सांगितला आहे. त्याचबरोबर त्याने लग्नाचा दिवस हा आयुष्यातील आजवरचा सर्वात चांगला दिवस असल्याचं म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या
- लक्ष्मण यांनी सांगितली टीम इंडियाची कमजोरी ; रोहित-गिलला दिला ‘हा’ सल्ला
- ‘शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- कोविड संदर्भातली माहिती पारदर्शकरित्या जनतेला का दिली जात नाही?
- ‘त्या’ चोरट्यांकडून जप्त केलेल्या ३४ पैकी २२ दुचाकी पोलिस आयुक्तांच्या हस्ते मूळ मालकांना परत
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण


