Share

आम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं ठाकरे सरकार घोटलोंकी सरकार- किरीट सोमय्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोपांची भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची सरबत्ती सुरु आहे. किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्या आरोपांनंतर ईडी, आयकर विभागाने याची दखल घेत संबंधित मंत्र्यांवर कारवाई केली, तर कोणाला समन्स बजावले तर कोणाच्या निकटवर्तीयांच्या कारखाने, कार्यालयांवर छापे मारले.

सोमय्या अनेकांचे आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, उपमुख्यमंत्री अजित पवार, बजरंग खरमाटे, अनिल देशमुख, भावना गवळी अशा बड्या नेत्यांना सोमय्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. आता त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे.

ठाकरे सरकारनी मंत्री हसन मुश्रीफचे जावई मतीन मंगोली, जयोस्तुते मेनेजमेंट कंपनी ला दिलेला १५०० कोटींचा कॉन्ट्रॅक्ट आत्ता रद्द केला आहे. आम्ही पुन्हा एकदा सिद्ध केले की ठाकरे सरकार घोटलोंकी सरकार, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!