औरंगाबाद : देशात सध्या कोळसा टंचाईचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या विषयावरुन हमरी तुमरी सुरु आहे. कोळसा टंचाईचं केंद्र सरकार राज्यावर आणि राज्य सरकार केंद्रावर खापर फोडत आहेत. राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील कोळसा टंचाईला राज्य सरकार जबाबदार असल्याचं म्हंटल आहे. औरंगाबादमधील बुधवारच्या पत्रकार परिषदेत बोलताना दानवे यांनी कोळसा टंचाईसाठी राज्य सरकारच दोषी असल्याचे म्हणाले.
कोळशाचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना राज्य सरकारनेच वेळेत कोळशाचा साठा उचलला नाही, त्यामुळे राज्यभरात कोळशाची टंचाई निर्माण झाली, असा आरोप केंद्रीय रेल्वे व कोळसा, खाणी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. गेल्या 15 दिवसांपासून कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्याअभावी वीजनिर्मिती घटली होती, त्यामुळे संपूर्ण राज्यावर भारनियमनाचे संकट घोंगावत होते.
गेल्या 15 दिवसांत राज्यातील वीजनिर्मिती प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने कोळशाचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे राज्यात औष्णिक वीज प्रकल्पातील वीजनिर्मिती घटली होती. कोळसा टंचाईमुळे राज्य अंधारात जाण्याची परिस्थिती ओढवली होती. त्यामुळे राज्य शासनाने केंद्र शासनावर निशाणा साधून वेळेत कोळसा पुरवठा होत नसल्याचा आरोप केला होता. यावरुन बोलताना दानवेंनी, कोळसा टंचाईसाठी राज्य सरकारच दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…हे कुठले डॉन आहेत का?’; जास्मिन वानखेडेंवरील आरोपानंतर मनसे आक्रमक
- ‘आज हमारी तो कल तुम्हारी बारी’; ईडी कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना उत्तर
- ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’
- ‘कॅ.अमरिंदर यांच्या अपमानाच्या भांगड्यात भाजपचे ढोलवादक होते हे स्पष्ट झाले’
- ‘कॅ.अमरिंदर यांना ‘चावी’ मारून भाजपात प्राण फुंकण्याचे राजकारण त्यांच्यावरच उलटेल’, संजय राऊतांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
