सांगली : राजकारणात शरद पवार हे मोठे नेते असले तरी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीचा हा महिमा असून कोणाला निवडायचं आणि पराजित करायचं हे जनता ठरवत असते, असं मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलं. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असताना, शरद पवारांना एक निवडणूक फार घासली होती, हे सुद्धा विसरता येणार नाही असेही पाटील यांनी यावेळी सांगितलं.
इथे आम्हाला पेटी बघायला मिळाली नाही, मात्र विरोधक खोक्याच्या बाबत चुकीची टीका करत आहेत. राजकीय क्रांती घडल्यामुळे अस्वस्थ झालेले महाविकास आघाडीचे नेते त्रस्त होऊन आमच्यावर टीका करत आहेत, असं सांगून शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले, ठाकरे गटातील आणखीन काही आमदार दसरा मेळाव्याच्या वेळी आमच्या सोबत येण्याची शक्यता ही पाटील यांनी यावेळी वर्तवली. उध्दव ठाकरे आणि आताच्या सरकारमध्ये जमीन आसमानचा फरक असून, महाविकास आघाडीची सत्ता असतानाची कामे झाली नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना होत आहेत, अस ही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Atul Bhatkhalkar | जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अतुल भातखळकरांनी राष्ट्रवादीवर केला हल्ला म्हणाले…
- Amravati | अमरावतीतून बेपत्ता झालेली मुलगी साताऱ्यात सापडली
- Amit Shaha | मुंबई दौऱ्या दरम्यान अमित शहांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा
- Shivsena | “आयकर विभागाच्या धाडी म्हणजे राजकीय फंडिंग”
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

