🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व पक्ष आगामी निवडणुकींची तयार करण्यात लागले असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांवर आरोप, टीकेची खेळी सुरू झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कवेळी सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा पराभव होणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर नेमकं काय म्हणाले?
हाच माज गांधी खानदानाला अमेठीबाबत होता. शेवटी त्यांना वायनाड शोधावे लागलं. तुम्हीही शोधून ठेवा, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी राष्ट्रलवादी काँग्रेस पक्षावर हल्ला केला आहे. यासंदर्भात भातखळकरांनी आपल्या ट्विटर आकाऊंवरून एक ट्विट केलं आहे.
एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा पराभव होणार नाही: जयंत पाटील.
हाच माज गांधी खानदानाला अमेठीबाबत होता
शेवटी त्यांना वायनाड शोधावे लागलं.
तुम्हीही शोधून ठेवा. pic.twitter.com/pMYeDrZP9s— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 7, 2022
सध्या राज्यामध्ये निवडणुकींचं वारं घुमू लागलं आहे. त्यामुळे कोणता पक्षनेता कोणत्या नेत्यावर काय आरोप करेल याचा काही नेम नाही. तसेच या आगामी निवडणूकांमध्ये
कोणता पक्ष कोणत्या पक्षाशी युती करेल हे पाहणं महत्वाचं ठरणारं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amit Shaha | मुंबई दौऱ्या दरम्यान अमित शहांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा
- Shivsena | “आयकर विभागाच्या धाडी म्हणजे राजकीय फंडिंग”
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
- Devendra Fadnavis | “उमाजी नाईक महामंडळ स्थापन अन् …”; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- PAK VS AFG । मैदानातच भिडले पाक-अफगान खेळाडू, मारण्यासाठी उचलली बॅट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
