Share

एनआयएच्या चौकशीमुळे वाझेंचे बोलविते धनी चिंतेत ; फडणवीसांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस सबळ पुरावे समोर येत असल्याने वाझेंच्या अडचणीत वाढ होत असून दुसरीकडं राजकीय वातावरण देखील तापलं आहे. एनआयएच्या चौकशीमुळे आघाडीतील लोक अस्वस्थ आहेत. नवाब मलिक आणि त्यांचे सहकारी घाबरले आहेत.

वाझे काय बोलणार याची त्यांना भीती वाटत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे वाझेंचे बोलविते धनी चिंतेत आहेत, असंही ते म्हणाले. मी केवळ फोन टॅपिंग प्रकरणाचे दोन पाने दिली होती. मलिक यांनी अख्खा अहवाल देऊन अहवाल फोडला, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

केंद्रीय गृहविभागाने स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला होता. आता, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास देखील एनआयएकडे सोपवण्यात आला असून एटीएसच्या हाती देखील मोठे धागेदोरे लागले आहेत. आता, ही केस व सर्व पुरावे एनआयएकडे सोपवण्यात यावा असं ठाणे सत्र न्यायालयाने आदेश दिले आहेत.

दरम्यान या सर्व प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी व भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची लढाई सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!