🕒 1 min read
औरंगाबाद : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द काढले याच्या निषेधार्थ औरंगाबाद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सावंगी बायपास रोडवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला जोड्याने मारून त्याचे दहन करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जन आशीर्वाद यात्रा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
देवाला सोडलेला वळू जसा कोणत्याच कामाला चालत नाही तसेच राहुल यांचे आहे. ते कोणत्याच कामाचे नाहीत. पंतप्रधान म्हणून मोदी जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत आहेत, तर राहुल गांधी या पदासाठी निष्क्रिय आहेत. अशी टीका बदनापूर येथील सभेत केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींवर केली होती. त्यांच्या या वक्तव्याबद्दल सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
जालना या ठिकाणी सर्वप्रथम रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळण्यात आला होता. मराठवाड्यातील सर्वठिकाणी याचा निषेध व्यक्त केला जात आहे. सावंगी बायपास रोड येथे सोमवारी (दि.२३) तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्यास जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, रामराव शेळके आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
- ‘ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’ ; किरीट सोमय्यांनी दिला सरकारला इशारा
- राणेंच्या घराबाहेर वरुण सरदेसाईंची पोलिसांना अश्लिल शिवीगाळ, मनसेकडून व्हिडिओ पोस्ट
- राणेंच्या अटकेमुळे आम्ही घाबरणार नाही , दडपणार नाही- केंद्रीय मंत्री भारती पवार
- सरकारच्या जीवावर तुम्ही कोणाकोणाला त्रास देणार?; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल


