🕒 1 min read
मुंबई : आज सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हैदोस माजलेले पाहायला मिळत आहे. याचे कारण आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेले आक्षेपार्ह विधान. या विधानामुळे संपूर्ण राज्यभारत तीव्र पडसाद उमट आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. नाशिक पाठोपाठ पुण्यात राणें विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील पोलिसांचे पथक रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी त्यांना संगमेश्वरमध्ये येथून ताब्यात घेतलं आहे.
नारायण राणे यांना आता संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून कार्यकर्त्यांनी बाहेरील परिसरात मोठी गर्दी केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आता यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे.
‘नारायण राणे विरोधात, ठाकरे सरकारचा कारवाईला आम्ही घाबरत नाही. घोटाळेबाजाना एक्सपोज़ करीत राहणार. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर नंतर आत्ता अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड वर कारवाई होणारच.’ अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला आहे.
नारायण राणे विरोधात, ठाकरे सरकारचा कारवाई ला आम्ही घाबरत नाही.
घोटाळेबाजाना एक्सपोज़ करीत राहणार.
अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर नंतर आत्ता अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड वर कारवाई होणारच @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 24, 2021
तर आता मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या भारती पवार यांनी देखील राज्यातील महाविकास आघाडीचा संचार घेतला आहे. ‘महाराष्ट्र सरकारकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही. सरकारचे हे कृत्य म्हणजे लोकांचा जन-आशीर्वाद यात्रेत भाजपाला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे आहे.’ असा टोला त्यांनी ट्वीट करून लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राणेंच्या घराबाहेर वरुण सरदेसाईंची पोलिसांना अश्लिल शिवीगाळ, मनसेकडून व्हिडिओ पोस्ट
- ‘…हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र’; राणेंच्या अटकेनंतर फडणवीसांची खोचक टीका
- ‘मुख्यमंत्र्यांच्या अंगी क्षमता, संयम आणि समंजसपणा देखील असावा’, आ.श्वेता महालेंचा टोला
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंकडून राष्ट्रदोह घडला, त्यावेळी का शांत होतात?’ राणे पत्रकारांवर घसरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
