🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नारायण राणे यांनी केलेल्या विधानामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यात शिवसेनेकडून थेट राणेंच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आल्याने वातावरण चिंताजनक झाले आहे. युवासनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी याठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी काही प्रमाणात दगडफेकही झाली. याचवेळी झालेल्या गोंधळात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे पोलिसांना अश्लिल शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मनसेचे अखिल चित्रे यांनी याबाबत ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून सरदेसाईंवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणले की,’वरूणजी तुमच्या सुसंस्कृतपणाचे आज दर्शन घडवल्याबद्दल तुमचे आभार !! वरुण सरदेसाई यांनी मुंबई पोलिसांची ” हिम्मत ” काढायची तुम्हाला गरज नाही, छातीवर गोळ्या खाऊन आमच्या मुंबईची रक्षा त्यांनी केली आहे, मुंबई पोलीस आम्ही तरी हे कधी विसरणार नाही’. असे म्हणत त्यांनी सरदेसाईंवर निशाणा साधला आहे.
वरून जी तुमच्या सुसंस्कृतपणाचे आज दर्शन घडवल्याबद्दल तुमचे आभार !! @SardesaiVarun
मुंबई पोलिस ची " हिम्मत " काढायची तुम्हाला गरज नाही छातीवर गोळ्या खाऊन आमच्या मुंबईची रक्षा त्यांनी केली आहे, @MumbaiPolice आम्ही तरी हे कधी विसरणार नाही @mnsadhikrut pic.twitter.com/WevLhx9LG6
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) August 24, 2021
दरम्यान, आव्हान देण्याची भाषा राणेंकडून करण्यात आल्यानंतर आपण त्यांच्या बंगल्याबाहेर जमलो, मात्र उंदिर आधीच पळून गेले होते. नारायण राणेंना अटक व्हायलाच हवी. शिवसेनेचे पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यासाठी कुठलाही कायदा-सुव्यवस्था हातात घ्यायचे नाही. ज्यांनी आव्हान दिले ते आम्ही स्वीकारले. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नारायण राणे यांना अटक करायची ही मागणी करायची आहे. तसेच ज्या पोलिसांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मारले त्यांनाही निलंबित करण्याची मागणी यावेळी वरुण सरदेसाईंनी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात अशा पद्धतीने केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची पहिलीच वेळ; राजकारणात उलथापालथ
- ‘…हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र’; राणेंच्या अटकेनंतर फडणवीसांची खोचक टीका
- ‘मुख्यमंत्र्यांच्या अंगी क्षमता, संयम आणि समंजसपणा देखील असावा’, आ.श्वेता महालेंचा टोला
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंकडून राष्ट्रदोह घडला, त्यावेळी का शांत होतात?’ राणे पत्रकारांवर घसरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
