औरंगाबाद : शहरात पाण्याची समस्या हा नेहमीचाच भाग आहे. अनेकदा उन्हाळ्यात शहराला भिषण पाणीटंचाई सहन करावी लागते. जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरल्यानंतरही पाण्याचे नियोजन निट होत नसल्याने शहराचा पाणी प्रश्न हा सुटत नाही. यावर मनपाने काही प्रमाणात पाण्याची समस्या सोडवण्यासाठी काही उपाययोजना राबवण्याचे ठरवले आहे.
याच उपाययोजनेचा भाग म्हणून मनपाने कांचनवाडी येथील प्लँटमधील नाल्यात सोडण्यात येत असलेल्या पाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी शुद्ध करण्यासाठी जाहिरात दिली आहे. कांचनवाडी येथील प्लँटमध्ये सध्या ६० ते ६१ एलएमडी पाण्यावर प्रक्रिया होत आसते. हे प्रक्रिया केलेल पाणी नाल्यात सोडले जात असते. नाल्यात सोडले जात असल्याने हे पाणी वाया जाते. याच पाण्यावर आणखी प्रक्रिया करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. औद्योगीक कंपन्यांनी प्रक्रिया केलेले पाणी प्राधान्याने वापरावे यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.
मात्र प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी शुद्ध नसल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेने जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात दोन एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला जाणार आहे आणि त्यासाठी पीएमसीमार्फत प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. पीएमसीच्या नियुक्तीसाठीच्या प्रस्तावाला मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पेट’ परिक्षेबाबत कुलगुरु प्रमोद येवले यांचा महत्वाचा निर्णय
- सेहवागचा जलवा कायम, अवघ्या 15 चेंडूत केल्या ‘इतक्या’ धावा
- पालकमंत्री देसाई दोन दिवसात घेणार शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी बैठक
- मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना
- आखेर ‘त्या’ महिलांच्या आभूतपुर्व लढ्याला यश; दारुबंदीचा ठराव मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
