🕒 1 min read
ठाणे : केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याला नव्याने ४ मंत्रीपदे देण्यात आली असून त्यातील एक कॅबिनेट तर उर्वरित तीन हे केंद्रीय राज्यमंत्रिपदे आहेत. ही मंत्रीपदे देण्यात आल्यानंतर आता राज्यात वेगवेगळ्या भागात भाजपने जन आशिर्वाद यात्रा सुरु केली आहे. मात्र भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात जन आशीर्वाद यात्रेविरोधात बॅनरबाजी करून टीकास्त्र सोडलं आहे. ‘आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा,’ असे बॅनर ठाणे शहर काँग्रेसने विविध पेट्रोल पंपाबाहेर लावले आहेत. एकीकडे सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अधिक आर्थिक बोजा वाढत आहे. कोरोनाचे धोका कायम आहे. अशातच भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढल्याने विरोधक चांगलेच आरोप करत आहेत.
या बॅनरवर भाजपची जनआशीर्वाद यात्रा, पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले, आधी केलेलं पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा, असा मजकूर छापून इंधनाचे दरपत्रकही छापण्यात आले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच घरगुती गॅसच्या दरात आणखी २५ रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींनी देखील संताप व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मला हवं तेव्हा ईडीला सामोरं जाईन’; अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण
- मोदींच्या कार्यकाळात एकही भ्रष्ट्राचाराची केस समोर आली नाही, अर्थ राज्यमंत्र्यांचा दावा
- ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे भाजपने सिद्ध करावे; ACB धाड प्रकरणी काँग्रेसचं आव्हान
- ‘मुख्यमंत्री हे संकटमोचक, अनेक संकटे येऊनही ते उत्कृष्ट काम करतायत’
- ‘मोदी सरकारच्या दबावातून काही जण महावसुली म्हणत बोंबलत आहेत, पण..’

