Share

‘मला हवं तेव्हा ईडीला सामोरं जाईन’; अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने आतापर्यंत पाचव्यांदा समन्स बजावले आहेत. ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यामुळे ईडी आता अनिल देशमुखांविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

अनिल देशमुख हे चौकशीसाठी का हजर झाले नाहीत कधी होणार? अशा अनेक चर्चा सुरु असताना स्वत: अनिल देशमुखांनी भाष्य केले आहे.‘मी कायद्याचं पालन करतो. मी जेव्हा हवं तेव्हा ईडीला सामोरे जाईन. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी पुढे जाईल. माझी याचिका कोर्टाने दाखल करुन घेतली आहे’, असं म्हणत अनिल देशमुखांनी आपली भूमिका मांडली आहे.

माझी ईडी बाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे आणि त्यांना सहकार्य करणार आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख यांना ईडीने पहिले समन्स २५ जून रोजी देऊन २६ जून रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. दुसरे समन्स तात्काळ २६ जून रोजी देऊन आठवड्याभरात म्हणजे ३ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!