मुंबई: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील ३ दिवस मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोरदार पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
IMD Mumbai has issued heavy rainfall warnings for Maharashtra for coming 3 days, especially for Marathwada region and it will be good for farmers in that region and around, who are waiting for good spell of rains for their crops.@RMC_Mumbai https://t.co/FzesWQ8KBb
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 16, 2021
दरम्यान मराठवाड्यातही जोरदार पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सातारा नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड,परभणी, बीड, हिंगोली, जालना, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने दिला आहे. दरम्यान या सर्व जिल्ह्यांना जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. १७ ऑगस्टला राज्यात विविध भागात जोरदार धारा बरसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
तर १८ ऑगस्टला कोल्हापूर सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करु’; मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा
- ‘आम्हाला भारतासोबत चांगले आणि मजबूत संबंध हवेत’- तालिबान प्रवक्ते
- ‘नितेश राणेंनी मोदींवर सुद्धा वैयक्तिक टीका केली होती; त्यांना मी उत्तर देणार नाही, पण…’
- ‘ ‘राज’दूतांना पात्रता सोडून जशास तसं छान उत्तर देता येतं’; रुपाली पाटील ठोंबरे कडाडल्या
- पंतप्रधानांनी दिलेला शब्द पाळला…पीव्ही सिंधूसोबत आईस्क्रीम खाण्याचं वचन अखेर पूर्ण


