कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान हिंसाचाराचे गालबोट लागले होते. त्यानंतर हिंसक घटना थांबल्या होत्या. मात्र, काल निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. निकाल लागल्यापासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राज्यात विविध ठिकाणी हिंसक घटना घडल्यात. नंदीग्राम येथे भाजपच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
चुनाव के बाद बंगाल में शुरू हुई हिंसा में 24घंटे में 9 लोगों की मौत हुई, प्रदेश में भय का वातावरण है। सत्ताधारी पार्टी हाथ बांध कर बैठी है, पुलिस निष्क्रिय है। हम राज्यपाल के पास निवेदन लेकर आए थे, उन्होंने निवेदन स्वीकार किया और आश्वासन दिया: दिलीप घोष, पश्चिम बंगाल BJP अध्यक्ष pic.twitter.com/AeByQHjVvS
— ANI_HindiNews (@AHindinews) May 3, 2021
‘निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारात २४ तासांत ९ लोकांचा मृत्यू झाला असून, राज्यात भीतीचं वातावरण आहे. सत्ताधारी पक्ष हातावर हात ठेवून बसला आहे. पोलीस निष्क्रय आहेत. आम्ही राज्यपालांना याबाबत निवेदन दिले आहे’ अशी माहिती पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिली.
पश्चिम बंगालमधील भटपारा येथील घोषपारा रोडवरील भाजपा कार्यालय आणि काही दुकानांमध्ये अज्ञात आज लोकांनी तोडफोड केली. परिसरात बॉम्बही फेकण्यात आले. ‘तृणमूलच्या हिंसक कार्यकर्त्यांनी माझे दुकान लुटले. येथे कमीतकमी १० बॉम्ब फेकले’ असे एका रहिवाशाने सांगितले.
West Bengal: BJP office and some shops in Ghoshpara road of Bhatpara were vandalized by unidentified people, earlier today. Bombs were also hurled in the area.
"TMC miscreants looted my shop. At least 10 bombs were hurled here," says a local. pic.twitter.com/jRY1ZaL14W
— ANI (@ANI) May 3, 2021
सोमवारी नंदीग्राममध्ये गोंधळ झाला असून भाजपच्या कार्यालयात तोडफोडीचा प्रकार झाला. याशिवाय कार्याला आग लावण्याचाही प्रयत्न केला. भाजपने आरोप केला आहे की, हे सर्व तृणमूल काँग्रेसनं केलं आहे. फक्त भाजप कार्यालयच नाही तर अनेक दुकाने आणि घरांमध्येही तोडफोड, आग लावण्याचे प्रकार समोर आले आहेत. भाजपचा आरोप आहे की, जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घटनास्थळी असलेले समाजकंटक पळून गेले. या घटनेनंतर नंदीग्राममधील वातावरण तणावापूर्ण बनले आहे.
महत्वाच्या बातम्या
- जनतेसाठी काम करण्याची सद्बुद्धी पांडुरंग ‘महावसुली’ सरकारला देवो !
- कोरोनाचे सौम्य लक्षणे असल्यास CT-SCAN करू नका, एम्सच्या संचालकांनी सांगितलं गंभीर ‘कारण’
- पराभवानंतर पाटील डिस्टर्ब झालेत, टीका सहन करण्याचीही ताकद असायला हवी – वडेट्टीवार
- शेजारणीसोबत भांडण झाल्याने दोन मुलांसह महिलेची इमारतीवरून उडी, दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
- ‘भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन सत्तांतराचा चमत्कार होण्याची शक्यता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

