जालना : कोराेना संकटाच्या काळात गरिब नागरिक, बारा बलुतेदार आणि व्यापारी त्रस्त आहेत. याकडे महाविकास आघाडी सरकारने तत्काळ लक्ष द्यावे, नसता जनता महाविकास आघाडीला धडा शिकवेल, असे मत माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केलय. मंगळवेढा मतदार संघातील निकालावरही त्यांनी सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केलीय.
या संदर्भात आमदार बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, ‘पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेने बेईमान सरकारला जागा दाखवली, आता तरी सरकारने शहाणं होण्याची गरज आहे. आतातरी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करण्याची सद्बुद्धी पांडुरंग ‘महावसुली’ सरकारला देवो !’
पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातील जनतेने बेईमान सरकारला जागा दाखवली, आता तरी सरकारने शहाणं होण्याची गरज आतातरी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करण्याची सद्बुद्धी पांडुरंग महा"वसुली" सरकारला देवो !
– माजी मंत्री आ. बबनरावजी लोणीकर@BJYM4MH @BJP4Maharashtra @BabanraoLonikar pic.twitter.com/tiZd8lDUrL— Rahul Lonikar (@lonikar_rahul) May 3, 2021
इतकच नाही तर महाराष्ट्र सरकारने जागे होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. ‘महाराष्ट्रात १०० कोटी रुपये वसुली केली, साधू संतांवर अन्याय-अत्याचार, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या महावसुली सरकारला पंढरपूर मतदारसंघातील जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. आता तरी महाराष्ट्र सरकारने जागे होण्याची गरज आहे.’ अशी टीका देखील आमदार लोणीकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शेजारणीसोबत भांडण झाल्याने दोन मुलांसह महिलेची इमारतीवरून उडी, दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
- ‘भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन सत्तांतराचा चमत्कार होण्याची शक्यता’
- बारामतीत लॉकडाऊन तर आता ‘या’ मनपा क्षेत्रात सात दिवस जनता कर्फ्यू
- मध्यप्रदेश, ओडिशानंतर ममतांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, माध्यम क्षेत्रात उमटले पडसाद
- …तर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे १७० उमेदवार निवडून आले असते – रामदास आठवले


