उस्मानाबाद: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्यात सरकारने संचारबंदी लागू केली आहे. असे असतानाही नागरिक नियमांचे उल्लंघन करत बाहेर फिरत आहेत तसेच दुकाने देखील दिलेल्या वेळे पेक्षा जास्त वेळ उघडी ठेवत आहेत, त्यामुळे नागरिक दुकानांमध्ये गर्दी करतायत. अशा वेळेस कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका नाकारता येत नाही, त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली असताना देखील नियमांचे उल्लंघन केले जात आये. अशांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
उमरगा शहरात व तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाची वाढत चाललेली साखळी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लावलेले असताना अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असताना वेळेत विनामास्क, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, शारीरिक अंतर अन् दुकानासमोर मार्किंग न करणे आदींसह जनता कर्फ्यू, संचारबंदी नियमांचे उल्लंघन करण्यात आले. यांच्या कारवाई करण्याची माेहीम राबवण्यात आली. मोहिमेतून ४३ हजार २०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शासनाने वाढता संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यू, लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली. परंतु, बऱ्याच व्यावसायिकांकडून कोविड आदेशाचे पालन होत नव्हते. विनामास्क दुचाकी चालवणाऱ्या व फिरणाऱ्या व्यक्तींसह दुकानासमोर मार्किंग नसणे, मास्क नसणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, शारीरिक अंतराचे उल्लंघन करणे अशा ११४ जणांवर दंडात्मक कारवाई करत ४३ हजार दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला. रविवारी जनता कर्फ्यूच्या काळात बाजारपेठेत, रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतीय संघात शार्दूलला अष्टपैलू खेळाडू म्हणून जागा मिळावी’
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबीयांची घरपट्टी माफ करा ; मनसेची मागणी
- सचिनने खराब गोलंदाजी करायला सांगितल्याचा पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूचा खळबळाजनक दावा
- रेड झोनमधील ‘या’ १४ जिल्हे वगळता लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता
- बीडमध्ये मोबाईलवरील चॅटिंगवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

