🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. शिंदे गटातील रामदास कदम तर उद्धव ठाकरे गटातील विनायक राऊत, भास्कर जाधव यांच्यात वाद सरु आहेत. हे नेते एकमेकांवर टीका करण्याची एक देखील संधी सोडत नाहीत. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रामदास कदम यांच्यावर घणाघात केला आहे. शिवसेनेतील गद्दारीची किड रामदास कदमांनी रुजवल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
“रामदास कदम यांची सुरु असलेली बडबड आम्ही फार गांंभिर्याने घेत नाही. कारण शिवसेनेतील गद्दारीची कीड सर्वप्रथम कोणी रुजवली असेल तर ती रामदास कदम यांनी रुजवली आहे. नारायण राणे जात असताना रामदास कदम ४ दिवस त्यांच्या बंगल्यावर राहून इतर सगळ्यांनी शिवसेनेतून फुटून राणेंकडे या, असे सांगत होते,” असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
रामदास कदमांचे भास्कर जाधवांना प्रत्युत्तर
ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर रामदास कदम यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे, असं म्हणत हल्ला केला होता. अशातच रामदास कमद यांनी जाधवांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.
भास्कर जाधवांना येडा झालेला कुत्रा चावला आहे. त्यांचा मेंदू सडलेला आहे. नासक्या डोक्यातून नासके विचार येतात, असं म्हणत रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. भास्कर जाधवांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत प्रवेश केला. परत, शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेत आले. उद्धव ठाकरेंना खूश करण्यासाठी हे बाटगेपणा दाखवत आहेत, असे रामदास कदम म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Sheetal Mhatre | शिल्लक सेनेला ‘असे’ मेसेजस करुन मुंबई मधून महिला गोळा करण्याचा प्रयत्न – शीतल म्हात्रेंचा रश्मी ठाकरेंना टोला
- National sports | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत
- World Heart Day | वर्ल्ड हार्ट डे, काय आहे या दिवसाचे विशेष महत्त्व? जाणून घ्या!
- Pankaja Munde | “मी सध्या बेरोजगार आहे, त्यामुळे…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने भर कार्यक्रमात हशा पिकला
- PM Yojana | ‘या’ योजनेअंतर्गत सप्टेंबर नंतरही गरिबांना मिळणार मोफत धान्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
