Share

PM Yojana | ‘या’ योजनेअंतर्गत सप्टेंबर नंतरही गरिबांना मिळणार मोफत धान्य

Published On: 

🕒 1 min read

गेल्या दोन वर्षांपासून भारतीय जनतेला कोरोनाच्या महामारीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गोरगरिबांना अन्नधान्याच्या संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते होते. आणि ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने गोरगरिबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत रेशन लाईन खाली येणाऱ्या लोकांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य दिले जाते. ज्या कुटुंबीयांकडे रेशन कार्ड नव्हते त्यांना देखील नंतर या योजनेत जोडण्यात आले. ताज्या अपडेट नुसार, ही योजना आणखी 3 महिन्यांसाठी म्हणजेच डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाची सूचना

अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही योजना 3 महिने वाढवल्यास सुमारे 45 हजार कोटींचं ओझं वाढेल. या योजनेअंतर्गत गोरगरिबांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्यात कपात करायची चर्चा होती, मात्र सध्या तरी यात काहीच बदल करण्यात येणार नाही.

तब्बल 80 कोटी लोक या योजनेशी जोडले गेले आहे

केंद्र सरकारच्या या योजनेशी जवळपास 80 कोटी लोक जोडले गेले आहेत. ही योजना मार्च 2022 मध्येच संपणार होती. पण त्यानंतर सप्टेंबर पर्यंत ही योजना सुरू ठेवण्यात आली. आणि आता शासनाच्या निर्णयानंतर या योजनेत डिसेंबर पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत धान्य कसे उपलब्ध होते

या योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्डधारकांना अतिरिक्त 5 किलो धान्य मिळते. दर महिन्याला मिळणाऱ्या रेशन सोबतच अतिरिक्त ते 5 किलो धान्य मिळते. ज्या रेशन दुकानातून तुम्ही तुमचे रेशन धान्य घेत आहात तिथूनच तुम्हाला हे रेशन मिळेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!