🕒 1 min read
रत्नागिरी : राज्यात सध्या भोंग्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेत पुन्हा मशिंदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला त्यांच्या सणात विष कालवायचे नाही. पण ४ तारखेनंतर ऐकणार नाही, असा अल्टीमेटम त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसल्याचे पाहवत नसल्याने राज ठाकरेंचा थयथयाट सुरु असल्याचे म्हटले आहे. ते रत्नागिरी मध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.
“भोंगा हा विषय मुद्दामहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी उकरला जात आहे. भोंग्याबाबत जर निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सराकराने समान कायदा करावा. देशपातळीवर अंमलबजावणी करावी. केवळ महाराष्ट्रात अतिक्रमण झाल्याचं दर्शवून मविआ सरकारला विशेष करून उद्धव ठाकरे साहेबांना त्रास द्यायचा या दुष्ट आणि कपट नितीने भाजपाची सुपारी घेऊन राज ठाकरेंनी केलेल हे नाट्य आहे.”, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच राज ठाकरेंची करमणूक करण्याची ही पद्धत जुनी आहे. प्रत्येक निवडणुकीला करमणुकीचे कार्यक्रम घेण्यासाठी कुणाची तरी सुपारी घ्यायची. उद्धव ठाकरे यांच्याविषयीचा मनात द्वेष असल्यामुळे स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलेला पहावत नसल्याने त्यांचा थयथयाट सुरु आहे. त्यांच्या दुष्ट आणि कपट नितीला भाजपची साथ आहे.”, असा दावाही विनायक राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…तेव्हा फडणवीस तर पळतांना दिसले”, बाबरी वादावरून दिपाली सय्यद यांची टीका
- मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात अटकेचे आदेश, अजामीनपात्र वॉरंट जारी!
- “इशारे दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटतील या भ्रमात…”, संजय राऊतांचा टोला
- “राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी..”, भोंगा आणि हनुमान चालीसा प्रकरणावर दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया!
- “आदित्यजी ‘या’ घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता”, केशव उपाध्येंचा टोला


