Share

“राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी..”, भोंगा आणि हनुमान चालीसा प्रकरणावर दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील काही दिवसांपासून भोंगा आणि हनुमान चालीसा प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळत आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सामनेही बघायला मिळत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. तसेच राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना दिपाली सय्यद म्हणाल्या की,‘महागाई सारखे अनेक विषय असताना ते सोडून राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी तुम्ही जातीपातीच युद्ध करत आहात. त्यात लोकांना अडकवून हरवून ठेवलं जात आहे.’ तसेच देवाला आपण आज राजकारणातला एक मुद्दा बनवला असून हे राजकारण आहे का ? एकाठिकाणी भोंगा एका ठिकाणी हनुमान चालीसा हे सगळ पाहून वाईट वाटत, असेही सय्यद म्हणाल्या.

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,‘राज्यात सर्वकाही बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. ही राष्ट्रपती राजवट लागू व्हावी म्हणून कुठल्याही पातळीला जाऊन अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!