Share

“…तेव्हा फडणवीस तर पळतांना दिसले”, बाबरी वादावरून दिपाली सय्यद यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईतील सोमय्या मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्ताने सन्मान सोहळा पार पडला. यावेळी बोलत असताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भ्रष्टाचार तसेच बाबरी पाडल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेला चांगलेच घेरले. बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता, असे फडणवीस यांनी म्हटले. यावरच शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना दिपाली सय्यद म्हणाल्या की,‘बाबरी मस्जिदवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा कुठे लपून बसले होते. फडणवीस तर पळताना दिसले होते. त्यामुळे बाबरी मस्जिदच्या वेळी फक्त हिंदू आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. त्याच्या पलीकडे कोणी उपस्थित नव्हते’, असे सय्यद म्हणाल्या.

दरम्यान, पुढे भोंगा आणि हनुमान चालीसा प्रकरणावर बोलतांना दिपाली सय्यद म्हणाल्या की,‘महागाई सारखे अनेक विषय असताना ते सोडून राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी तुम्ही जातीपातीच युद्ध करत आहात. त्यात लोकांना अडकवून हरवून ठेवलं जात आहे. तसेच देवाला आपण आज राजकारणातला एक मुद्दा बनवला असून हे राजकारण आहे का ? एकाठिकाणी भोंगा एका ठिकाणी हनुमान चालीसा हे सगळ पाहून वाईट वाटत.’

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!