कोलकत्ता : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेली जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, देशातील राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे. लसीच उपलब्ध होत नसल्याने अनेक राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबवले आहे. केंद्र सरकारने, ‘जून महिन्याच्या मध्यापर्यंत लसी उपलब्ध होतील’ असे सांगितले आहे.
तर केंद्राने डिसेंबर पर्यंत देशात कासीकरण पूर्णत्वास नेहून दाखवणार असल्याचे सांगितला आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा देशातील कोरोना लसीकरणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना बॅनर्जी यांनी, ‘डिसेंबर २०२१ पूर्वी देशातील सर्व नागरिकांना करोना विषाणूची लस देण्यात येईल, हा केंद्र सरकारचा दावा देखील लबाडीच आहे’ असा घणाघात केला.
‘डिसेंबर २०२१ पूर्वी देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा केंद्र सरकारचा दावा ही देखील एक लबाडीचं आहे. ते केवळ निरर्थक व पोकळ दावे करत असतात. केंद्राने सर्व राज्यांना लसींचा मोफत पुरवठा करायला हवा.’ अशी मागणी देखील बॅनर्जी यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ६ जूनला हजारो मराठे रायगडावर दाखल होणार, सरकारने थांबून दाखवावे!
- एकवेळ केंद्रातलं सरकार पडेल पण महाराष्ट्रातील सरकार पडणार नाही; पटोलेंच फडणवीसांना प्रत्युत्तर
- चीनमध्ये आता तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी, सरकारच्या निर्णयाचे नागरिकांनी केले स्वागत
- परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी औरंगाबाद मनपाचे ‘विशेष अभियान’
- ‘राज-उद्धव एकत्र येणार ?’ राज ठाकरेंच्या ‘त्या’ उत्तरानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया


