औरंगाबाद : शासननिर्देशानुसार राज्यात ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोहिमेच्या पहिल्या दिवशी एकूण ७७९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
लसीकरणाच्या पहिल्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर्सच लसीकरण करून घेतले होते. यानंतर ६० वर्षावरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. सुरुवातीला ज्येष्ठांनी लसीकरणासाठी उत्साह दाखविला मात्र गेल्या काही दिवसात ज्येष्ठांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, पुढील टप्प्यात आता ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठीच्या सूचना आरोग्यसेवा अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार, शनिवारपासून या मोहिमेला शहर व जिल्ह्यात प्रारंभ करण्यात आला.
या अंतर्गत मोहीमच्या पहिल्या दिवशी शनिवारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण ७७९ नागरिकांना लस देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली. वयोगट ३० ते ४४ साठी जिल्ह्यात ८ ठिकाणी लसीकरण केंद्र देण्यात आले आहेत. यात वाळुज, आमठाणा, मनुर, बाजारसावंगी, अडुळ, लाडसावंगी, औराळा याप्राथमिक आरोग्य केंद्रासह करमाड ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्या लाटेमुळे देशाचे दोन लाख कोटींचे नुकसान, आरबीआयचा अंदाज
- बांग्लादेशच्या लढ्यात मोदी कोणत्या तुरुंगात होते? पंतप्रधान कार्यालयाने दिले ‘हे’ उत्तर
- ‘अनलॉकमध्ये गर्दी वाढत आहे, काळजी घ्या’, केंद्रीय सचिवांच्या राज्यांना सुचना
- ‘स्वत:ला सांभाळा नाहीतर तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे समजणारही नाही’
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

