Share

‘अनलॉकमध्ये गर्दी वाढत आहे, काळजी घ्या’, केंद्रीय सचिवांच्या राज्यांना सुचना

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याने काही राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रात देखील टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राबवण्यात येतेय. पण अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळतेय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून अनलॉकसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे.

केंद्र सरकारने आज शनिवारी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. केंद्राने राज्यांना म्हटलंय की, राज्यांनी कोरोना लॉकडाऊननचे नियम शिथिल करताना काळजी बाळगावी. अनलॉकची प्रक्रिया राबवताना कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी, तपासणी-उपचार आणि लसीकरणासारख्या ‘खूपच महत्त्वपूर्ण’ अशा पाच बाबींचा अवलंब कटाक्षाने करावा.

“काही राज्यांमध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर मोठ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे अनलॉक करताना किंवा निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकारांनी काळजी घेण्याची गरज आहे”, असं या पत्रामध्ये गृह सचिवांनी नमूद केलं आहे.

लसीकरणाची गती वाढवा
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटलंय की, संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सध्य परिस्थितीमध्ये कोरोना लसीकरणाची मोहिम अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी पुढे म्हटलंय की, राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरणाची गती आणखी वाढवायला हवी.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!